2025–26 ची जागतिक आर्थिक मंदी : एक चिंतन
आजचा काळ अत्यंत निर्णायक टप्प्यावर
उभा आहे. संपूर्ण जग एका गंभीर आर्थिक संकटाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
आर्थिक तज्ञ, संस्थात्मक रेटिंग एजन्सीज, आणि भूतलावरचे अनुभव दर्शवतात की आपण
सर्वांत मोठ्या मंदीकडे झुकत आहोत.
सध्याचे वातावरण पाहता, अमेरिकेच्या
धोरणांमध्ये झपाट्याने बदल होत आहे. सेन्क्शन्सच्या नावाखाली त्यांनी निर्माण
केलेली अनिश्चितता आता प्रत्यक्ष परिणाम दाखवू लागली आहे. जागतिक बाजारातील
अस्थिरता, शेअर बाजारातील सतत घसरण, व्यापाऱ्यांवर वाढलेला कर्जाचा भार आणि
नोकऱ्यांवरील टांगती तलवार हे सर्व या संकटाची पूर्वसूचना आहेत.
पूर्वी १० लोकांपैकी एखादा माणूसच
नोकरीच्या अस्थिरतेबद्दल विचारायचा. पण गेल्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण
झपाट्याने वाढले असून, आता १० पैकी ८ लोक रोजगार गमावण्याची भीती व्यक्त करत आहेत.
उद्योगधंदे चालवणारे व्यापारी देखील आपला व्यवसाय चालू ठेवण्यासाठी कर्जाच्या
भरोशावरच उभे आहेत.
या सर्व घटनांचा सूक्ष्म दृष्टिकोनाने
विचार केल्यास, हे सर्व ‘शनीच्या कार्यप्रणाली’चे संकेत मानले जातात. जसे कोविडने
आपल्यावर शरीरावर प्रहार केला, तसाच आता हा आर्थिक तूफान आपल्या संपत्तीवर प्रहार
करतो आहे. त्यामागचा उद्देश म्हणजे माणसाला आपल्या अहंकारातून बाहेर काढणे आणि
त्याला शहाणपण शिकवणे.
सोने, शेअर्स आणि क्रिप्टो मार्केटचा
धोका:
आज सोशल मीडियावर अशी अफवा पसरवली जात आहे की सोने ५०० पर्यंत घसरेल, अमेरिका आपला
गोल्ड रिजर्व विकेल, आणि सगळी मालमत्ता क्रिप्टोमध्ये कन्व्हर्ट करेल. ही अफवा एक
प्रकारे लोकांना फसवण्याचं शस्त्र आहे. लोकांमध्ये लालच निर्माण करून त्यांना
नुकसानाच्या गर्तेत लोटले जात आहे. शेअर बाजारात देखील अशाच प्रकारची गोडीगुलाबी
दाखवून अनेकांना अडकवण्यात आले आणि आज हजारांपैकी फार थोड्यांनीच नफा मिळवला.
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य
माणसासाठी आवश्यक आहे की तो कोणत्याही आर्थिक मोहात न पडता, आपली संपत्ती जशी आहे
तशी सुरक्षित ठेवावी. कोणतीही नवीन गुंतवणूक, मग ती SIP असो, बुलियन शॉर्टिंग असो,
वा नवी कर्जे घेणे असो – टाळली पाहिजे.
संकटावर मात कशी करावी?
आपल्याकडे जे काही आहे, ते जपून ठेवावे. एखादी आर्थिक अडचण आली, तरच जुनं सोने
विकावं. गुंतवणूक कमी करावी, खर्चावर नियंत्रण ठेवावं, आणि कोणत्याही अफवांना बळी
पडू नये.
नव्या युगाची तयारी:
डिसेंबर २०२५ नंतरच जग नव्या आर्थिक युगात प्रवेश करेल. त्या आधीपर्यंत संयम,
सजगता, आणि सुरक्षिततेचा मार्गच योग्य आहे. आपण कोणत्या पातळीवर उभे आहोत हे याच
काळात सिद्ध होईल.
निष्कर्ष:
आजचे हे आर्थिक संकट म्हणजे केवळ एक काळोखा पर्व नाही, तर आपल्या मानसिक आणि
व्यावसायिक मजबुतीचा कस लागणारा काळ आहे. जे सजग राहतील, संयम ठेवतील, तेच यामधून
सुरक्षितपणे बाहेर पडतील. म्हणूनच, काळजी घ्या, सजग रहा, आणि आर्थिक मोहांपासून
दूर रहा.