भारत-पाकिस्तान संघर्ष: वास्तव आणि तयारी
आज जगात जी काही लढाया किंवा संघर्ष
होतात, त्या फक्त रणभूमीत नव्हे तर मनात, माध्यमात आणि मनोवृत्तीतही लढल्या जातात.
भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढते तणाव आणि संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण
याच वास्तवाचा वेध घेणं अत्यंत आवश्यक आहे.
अफवा
आणि वास्तव यामधील फरक
सध्याची परिस्थिती पाहता,
माध्यमांमधून येणाऱ्या अनेक बातम्या निरनिराळ्या दृष्टिकोनातून सादर केल्या जात
आहेत. काही वेळा या बातम्या खोट्या असतात, काही सत्याच्या जवळ जातात. आपली
जबाबदारी म्हणजे या माहितीची शहानिशा करणं आणि मनगटात बळ साठवणं.
युद्ध
म्हणजे काय?
युद्ध म्हणजे फक्त हत्यारांची टक्कर
नव्हे, तर मानसिक आणि आर्थिक शक्तीचीही कसोटी असते. युद्धात एखादी बाजू पूर्णपणे
जिंकते आणि दुसरी हरते, असं समजणं चुकीचं आहे. दोन्ही बाजूंना नुकसान होतंच.
म्हणून युद्धाची खरी तयारी म्हणजे — आपले नुकसान कसे कमी करता येईल, हे समजून घेणं
आणि त्यावर उपाययोजना करणं.
पाकिस्तानची
स्थिती: आतून गळालेला शत्रू
पाकिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय
पातळीवर विविध देशांकडून भीक मागत आहे — कधी चीन, कधी सौदी अरेबिया, कधी
तुर्कस्तान. त्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली असून, त्यांनी युद्धासाठी वापरायचे
विमानेही नीट देखभाल न केल्यामुळे कोसळत आहेत. त्यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच
१०,००० शवपेट्या आणि ३,००० बॉडी बॅग मागवल्या आहेत — हीच त्यांची मनस्थिती
दर्शवते.
भारताची
तयारी: आत्मविश्वास आणि शिस्त
पंतप्रधान मोदींनी दिलेल्या स्पष्ट
निर्देशानुसार, भारतीय सेनांना पूर्ण मुभा दिली आहे. भारतीय सैन्य केवळ शौर्यानेच
नव्हे तर तांत्रिक आणि रणनीतिक दृष्टीनेही सक्षम आहे. आपले सैनिक प्रशिक्षित आहेत,
शिस्तबद्ध आहेत आणि राष्ट्रासाठी काहीही करण्यास तयार आहेत.
निष्कर्ष
'टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, और
झूठे मन से कोई बड़ा नहीं होता' — अटलजींच्या या ओळी पाकिस्तानच्या सद्यस्थितीचं
वास्तव मांडतात. भारताने अजून काहीही केलेले नसतानाही पाकिस्तान आपल्या फौजांसाठी
मृतदेहाच्या तयारीत आहे. भारतासाठी हाच क्षण जागृत राहून सज्ज राहण्याचा आहे.