POK तील असंतोष आणि भारताची धोरणात्मक संधी
भारताच्या सीमेला लागून असलेला
पाकिस्तान-ऑक्युपाइड कश्मीर (POK) आज एक नव्या असंतोषाच्या ज्वालामुखीवर उभा आहे.
आज जेथे 'आजादी'च्या घोषणा दिल्या जात होत्या, तिथेच आता 'पाकिस्तानपासून
मुक्ती'च्या आवाजाने गगनभरारी घेतली आहे. याचे कारण केवळ वीज दर, कर, आणि सरकारी
जुलूमपुरते मर्यादित नसून, तो एक व्यापक असंतोषाचा भाग आहे जो पाकिस्तानच्या
शोषणकारी धोरणांमुळे निर्माण झाला आहे.
POK मधील नागरिक 45 ते 50 रुपये प्रति
युनिट दराने वीज खरेदी करतात, तर भारतात काश्मीरमध्ये हीच वीज 5-6 रुपयांमध्ये
उपलब्ध आहे. ही आर्थिक असमानता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे – जर भारत
आपल्याला ही सवलत देऊ शकतो, तर आपण का पाकिस्तानात अडकून राहतोय?
भारतासाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे.
आम्ही कोणताही लष्करी हस्तक्षेप न करता, केवळ आर्थिक विकास, सामाजिक सुविधा आणि
आधुनिकतेच्या जोरावर आपला काश्मीर एवढा प्रगत करू शकतो की POK मधील लोक स्वतःच
पाकिस्तानविरोधात बंड करतील. काश्मीरमध्ये उत्तम रस्ते, शिक्षणसंस्था, रुग्णालये,
खेळाचे मैदान, उद्योग क्षेत्र यांचे जाळे विणून आम्ही ‘विकास’ हाच खरा शस्त्र
म्हणून वापरू शकतो.
या पार्श्वभूमीवर, POK मध्ये एक नवी
लीडरशिप तयार होताना दिसते. 'हलवा कॉन्फरन्स'सारखे विनोदी पण प्रतीकात्मक उपहास
जनतेच्या भावना व्यक्त करत आहेत. लोक स्वतःहून पाकिस्तानी लष्कराला विरोध करत
आहेत, तेव्हा आपल्याला केवळ राजनैतिक, नैतिक आणि मुत्सद्दी पातळीवर पाठिंबा
द्यायचा आहे.
चीनच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित
होतो. सीपेक प्रकल्पांद्वारे चीनने तिथे पाय रोवले असले तरी, चीनचा इतिहास आहे –
जेथे समस्या निर्माण होतात, तेथून ते माघार घेतात. दासू डॅमपासून कराची
युनिव्हर्सिटीपर्यंतचे त्यांचे पलायन त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे चीनची उपस्थिती
दीर्घकाळ राहील, याची शक्यता कमी आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट
स्पष्ट होते – ज्या प्रकारे पाकिस्तानी धोरणकर्त्यांनी काश्मीरमध्ये अस्थिरता
निर्माण केली, त्याचेच प्रतिबिंब आज त्यांच्या ताब्यातील कश्मीरमध्ये उमटत आहे.
'आजादी'च्या नाऱ्यांचा गजर आता त्यांच्या कानावर आहे, आणि हे केवळ प्रारंभ आहे.
आज ही आग POK मध्ये पोहोचली आहे, आणि इतिहास आपलेच प्रतिबिंब दाखवत आहे – जसे कर्म तसे फळ. भारताला यामधून फक्त एक गोष्ट करायची आहे – आपल्या काश्मीरला एका तेजस्वी उदाहरणात रूपांतरित करायचं आहे. बाकी सगळं इतिहास आपोआप लिहील.