तुर्कीची भूमिकाः भारतासाठी धोका की धडा?

 

Turkey's role a threat or a lesson for India

तुर्कीची भूमिकाः भारतासाठी धोका की धडा?

जगातील भू-राजकीय समीकरणे दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक संघर्षांची शक्यता अधिक तीव्रतेने भासू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर तुर्की (Turkey) हे देश पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

तुर्की हे नाटोचे (NATO) सदस्य असूनदेखील, भारतविरोधी पद्धतीने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले आहे. भारताने जेव्हा आतंकवाद्यांवर कारवाई केली, तेव्हा तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवून आपले वास्तव स्पष्ट केले.

पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्र ही त्यांची स्वतःची निर्मिती नसून ती चीन व अमेरिका यांच्याकडून आलेली आहेत. चीनने पाकिस्तानमध्ये आपले क्षेपणास्त्र (missiles) ठेवलेले असून भविष्यातील युद्धात चीन, पाकिस्तान आणि तुर्की एकत्र भारताविरोधात भूमिका घेतील, अशी गंभीर शक्यता वर्तवली जाते.

तुर्कीच्या सभ्यतेचा ऱ्हास

तुर्कीचा इतिहास पाहिला तर विविध काळांमध्ये तिथे पारशी, ख्रिश्चन आणि मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. मात्र, या सर्व सभ्यतांचा ऱ्हासही झाला आहे. भविष्यवाणीप्रमाणे, 2026 नंतर तुर्कीमध्ये उलटी गिनती सुरू होईल व 2030 पर्यंत ही सध्याची तुर्की नावाची सत्ता पूर्णतः नष्ट होईल. टर्कीमध्ये सुरू असलेली अराजकता आणि चुकीचे राजकीय निर्णय त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतील, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

पर्यटन व व्यापार - भावनिक मूर्खपणा

अनेक भारतीय अजूनही तुर्की, काश्मीर, अज़रबैजानसारख्या भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या ठिकाणी फिरायला जातात. त्यातून तेथील अर्थव्यवस्थेला फायदा होतो, आणि अप्रत्यक्षपणे भारतविरोधी शक्तींना बळ मिळते. आपल्या पैशांचा वापर आपल्याच सैनिकांच्या विरोधात वापरला जातो, याची जाणीव आपल्याला असायला हवी.

देशभक्ती म्हणजे सजगता

आजच्या घडीला देशभक्ती फक्त घोषणांपुरती न ठेवता, आपल्या कृतींतून दाखवणे आवश्यक आहे. कोणत्या देशाशी व्यापार करायचा? कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करायचे? याचे भान ठेवणे हे देखील राष्ट्रसेवेचा भाग आहे. भावनांना गोंजारणाऱ्या गोष्टींपेक्षा वास्तवाचं भान ठेवून आपली भूमिका ठरवली पाहिजे.


शेवटचा विचार

तुर्कीची सद्य भूमिका भारताच्या दृष्टीने शंकास्पद आहे. भविष्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे भारतातील नागरिकांनीही त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सजग नागरिकच राष्ट्रविकासाचे खरे शिल्पकार असतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने